Thursday, May 28, 2015

* स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम *

(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)
१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ मातृ निधन.
१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ पितृनिधन.
१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च विवाह.
१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्याचा उत्सव, अध्यक्ष— बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ दुसर्या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
१९२५ जाने.७ कन्या “प्रभात” हिचा जन्म.
१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.
१९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
नि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.
१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भारत’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार….

*** नक्की कोण आहेत सावरकर ***
सावरकर.... एकमेवाद्वितीय.....

१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे
अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९००
मध्ये त्यांनी संपूर्ण
स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) १८५७ च्या बंडास "सातंत्र्ययुद्ध" म्हणून
गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्तानातील
जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने
काढलेल्या पत्रकास, "मॅग्ना कार्टा" ला "एक
भिकार चिरोटे" म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच,
१९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए.
ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी...
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच
पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर
बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश
दिलa
६) परदेशी मालाच्या होळीमुळे
देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून
टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.....
७) मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद
दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी...
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन)
त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत
ठेवणारे सावरकर हे पहिलेच...
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने
सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले
सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात
आले असे पहिलेच क्रांतीकारक...
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७
च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव
साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे
सावरकरच....
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून
घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले...
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील
क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच
पहिले... त्यासाठी तुर्की,रशियन,आय
रिश,इजिप्शियन,फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क
केला होता...
१५) विसाव्या शतकात २
जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर
हे एकमेव आणि फ़क्त सावरकरच...
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने
आणि खिळ्याने महाकव्य रचणारे महाकवी एकमेव
सावरकर.... तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत
लिहिल्या,मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित
करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर...
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत
ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन
ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू
पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय...
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते
आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून
मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर
हेच एकमेव... व्याकरणात त्या व्रूत्तांना "वैनायक"
म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात
प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात
हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले...
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर
स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै.
श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच
प्रेरणेतून रत्नागिरीत "पतितपावन" मंदीर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध
म्हणून गौरवीत असतना, मात्रूभाषा व
राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फ़क्त
सावरकरच पहिले...
२४) प्रत्यक्ष साहित्य
संमेलनाच्या व्यासपीठावरून, "लेखण्या सोडा,
बंदुका हाती घ्या" असा दिव्य दाहक
संदेश देणारे
पहिले साहित्यिक सावरकरच...
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून
देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य
बनवणारे सावरकरच.... लिपीमध्ये
सुधारणा करणारा जगातील एकमेव
नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फ़क्त
सावरकरच......

गुरुजी : तर हि गोष्ट आहे….
संत एकनाथांची,
एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर
आल्यावर
एक यवन (मुसलमान) त्यांच्यावर थुंकला त्यांनी
परत नदीत बुडी मारली
आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत
बुडी मारली, अस १०८
वेळा घडल नाथांनी न
त्याला शिव्या शाप दिले
न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात
सांगितली आणि त्यांनी
यावरून या गोष्टीच
तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने
त्याने आपापल्या बुद्धी
प्रमाणे पुढील
उत्तर दिली :
१ - नाथ किती महान
होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील
वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव
ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने
जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा
अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्याला माफ
करण्यातच खरा आनंद लपला आहे
अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली
पण
एक विद्यार्थी मात्र गप्प
होता.
शिक्षकांनी त्याला
विचारले तू काही उत्तर
देत, त्यावर तो विद्यार्थी
उठून उभा राहिला आणि
म्हणाला,
“गुरुजी माझ्या मित्रांनी
जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात
आलेल्या
शिकवणुकी नुसारच दिली
पण, नाथांची हि गोष्ट
ऐकल्यावर माझ्या लक्षात
आल ते अस….“कि हिंदू समाज तेव्हा हि
निद्रिस्त
होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले,
काय बोलतोस तू…?
नाथांना चूक ठरवतोस…..?
तो विद्यार्थी म्हणाला,
“ नाही गुरुजी मी
नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे
काही
वागले ते त्यांच्या
सन्यस्थ वृत्तीला
साजेसच होत. या कृती
मुळे ते संत पदाच्या
सर्वोच्च स्थानी बसले
पण…?,
तो यवन जेव्हा १०८ वेळा
थुंकत होता त्यावेळी
हिंदू समाज निष्क्रीयतेने
पाहत होता. त्याला या
गोष्टीचा विरोध करावा
असे मुळीच वाटले नाही.
नाथ संत असले तरी तो
हिंदू समाज संत नव्हता,
जर वेळीच चोप दिला
असता तर तो यवन
नाथांवर १०८ वेळा
थुंकला नसता.
नाथांनी जस त्याचं काम
केल तस हिंदूंनी त्याचं
काम करण योग्य होत,
न कि,नाथांच्या या कृतीचा
चुकीचा अर्थ विचार
लोकात पसरवण .
हे बाणेदार उत्तर देणारा
तो विद्यार्थी होता :

।। विनायक दामोदर सावरकर ।।