* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो.
* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.
* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.
* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.
* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.
* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.
* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.
* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.
* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.
* दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे.
* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.
* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.
* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.
* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.
* रविवारी आले खाऊ नये.
* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.
* उभे राहून पाणी प्यायला नको.
* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.
* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाही.
Saturday, April 18, 2015
* तिथीनुसार आहार-विहार *
*** नक्षत्र *** स्वभाव निश्चित करतात...
ग्रहांचा मानवी जीवनात प्रभाव पडत असतो. भविष्याचे संकेत हे ग्रह आपल्याला देत असतात. सर्वांत प्रथम लग्न स्वत:ला दर्शवितो, त्यानंतर सप्तममध्ये तो आपल्या जीवनसाथीचा भाव असतो. चतुर्थ भाव स्वत:च्या कुटुंबाचा तर पंचम भाव प्रेमाचा असतो. नवावा भाव भाग्याचा समजला जातो.
द्वितीय भावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा भाव वाणी आणि महिलांच्या कुंडलीत सौभाग्याचा असतो. पुरूषांच्या कुंडलीत आठवा भाव महिलांबाबत असतो. हे सर्व भाव ओळखून जीवनसाथी मिळाल्यास जीवन सुखी होईल.
द्वितीय भाव वाणीचा असल्याने सर्वांत प्रथम आपल्या जीवनसाथीची वाणी तपासून घेतली पाहिजे. त्याचे बोलणे गोड आहे की नाही, हे पाहावे. द्वितीय भावात कनिष्ठ केतू असू नये. सूर्य, शनी असेल तर वाणीत दोष असेल. मंगळ शनी असेल तर महिलांच्या कुंडलीत सौभाग्यास हानी पोहचू शकते.
* नक्षत्राची एकूण संख्या 27 आहे. एक राशी अडीच नक्षत्राची असते. अशा प्रकारे 12 राशी तयार झाल्या आहेत. या नक्षत्रावर आपला स्वभाव निर्धारित होत असतो.
1.
अश्विनी-
बौद्धिक प्रगल्भता, तेज स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षतत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात.
2.
भरणी-
स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे.या नक्षत्राचा स्थायी भाव आहे.
3.
कृतिका-
कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रामक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते.
4.
रोहिणी-
रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेले लोक प्रसन्न, कलेत प्राविण्य मिळवणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुचि असणारे असतात.
5.
मृगराशी-
बु्ध्दीवादी व भोगवादी यांचा समन्वय, उत्तम बुध्दीमत्ता तसेच यांचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे, हा नक्षत्राच्या लोकांचे विशेष म्हणावे लागेल.
6.
आर्द्रा-
आर्द्रा नक्षत्र असणारे लोक खुप संतापी असतात. निर्णय घेताना ते नेहमी द्विधा मन:स्थितीत सापडतात. ते संशयीही असतात.
7.
पुनर्वसु-
पुनर्वसु नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात. अध्यात्मात अधिक रुची घेत असतात.
8.
अश्लेषा-
जिद्दी स्वभावामुळे कधीकधी असे लोक अविचारी होऊन बसतात. कोणावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु प्रत्येक कामात 'आ बैल मुझे मार' असे करत नेहमी वादळाला आमंत्रण देत असतात.
9.
मघा-
स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्वाकांक्षी व सहज नेतृत्व असे गुण मघा नक्षत्र असणार्यांमध्ये असतात.
10.
पूर्वा-
पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळु, कलाप्रेमी, रसिक व छंदी असतात.
11.
उत्तरा-
या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अत्यंत परिश्रमी असतात.
12.
हस्त-
कल्पनाशील, संवेदनशील, सुखी, समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
13.
चित्रा-
लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणार्यांमध्ये जाणवतात.
14.
स्वाती-
संयमी, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती तसेच दु:खा खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते.
15.
विशाखा-
स्वार्थी, जिद्दी तसेच आपलीच टिमकी वाजविणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सिदा करण्यात ही मंडळी माहिर असते.
16.
अनुराधा-
कुटुंबवत्सल, श्रृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
17.
ज्येष्ठा-
स्वभाव निर्मळ परंतु शत्रु ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात.
18.
मूल-
जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रमताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणी धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात.
19.
पूर्वाषाढा-
शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्य प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात.
20.
उत्तराषाढा-
विनयशील, बुध्दीमान, अध्यात्मात रूची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
21.
श्रवण-
श्रद्धाळू, परोपकारी, कतृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
22.
धनिष्ठा-
धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात.
23.
शततारका-
व्यसनाधीनता आणि कामवासनेकढे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात.
24.
पुष्य-
पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुध्दीमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो.
25.
पूर्व भाद्रपदा-
अधिक बुध्दीमान, संशोधक वृत्ती तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
26.
उत्तरा भाद्रपदा-
मोहक चेहरा, संवादकौशल्याने निपून, चंचल व इतरांना चटकण मोहून घेणे, हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणार्या लोकांचा असतो.
27.
रेवती-
रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान असतात. ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात.