जरुर वाचा.......
✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध
ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे
तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार
नाही.
✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू
नका.
✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे
फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले
कर्म करण्याची वेळ आली आहे.
✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण
स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत
बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु
शकणार नाही.
✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर
पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन
पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात
तुम्ही जाल त्यात जिव ओता .त्यात
सर्वोचस्थानी पोहोचा.
✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर
स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले
पाहिजे.
✔ घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे
सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत
नाही.
✔ आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात
केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
✔ चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई
असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
✔ जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस
काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले
नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
✔ बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत
नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते
कशातच बदल घडवू शकत नाही.