Friday, July 10, 2015

Signature...

१)       जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काठतात ते विलक्षण प्रतिभावंत असतात. अशी लोकं हाती घेतलेल्या कार्याला विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख सुविधा प्राप्त होतात.

२)       जी व्यक्ती किचकट अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी काढतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवू देखील शकतात. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात.

३)       काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात.
त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. अशी लोक सहसा धुर्त असतात. ही लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणालाही नुकसान देऊ शकतात.

४)       जे लोक कलात्मक आणि आकर्षक हस्ताक्षर करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशा हस्ताक्षर करणाऱ्या व्यक्ती जास्त करून कलाकार असतात.

५)       काही लोकं हस्ताक्षराच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात. खर्च करण्यामध्ये या लोकांचा आकडता हात असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस देखील म्हणू शकतो.

६)       जे लोक हस्ताक्षरातील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो.

७)       ज्या व्यक्तींच्या हस्ताक्षरात लयबद्धता आठळत नाही त्या व्यक्ती मानसिक रूपात अस्थिर असतात. यांना मानसिक कार्यात अधिक श्रम करावे लागतात.

८)       ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मधेच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याही कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते.

९)       काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांचे हस्ताक्षर हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी काम चांगल्या स्वरूपात करतात. प्रत्येक कामात अशा व्यक्ती संतुलन बनवून असतात. दुसऱ्यासमोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात एक अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात.

१०)    जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहीताना खालून वर घेऊन जातात ते लोक आशावादी असतात. निराशा ही त्यांच्या स्वभावातच नसते. अशा लोकांचा देवावर अधिक विश्वास असतो. या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगल प्रतिनिधीत्व करू शकतात.

Monday, July 6, 2015

Betel leaves and importance

*** *** Betel leaves and importance

1- On this page of the ends-laksmivasa

2- vidaya the smell right Ba jusa bramhadevanca page ..

3- vidaya in the middle of the page
Goddess Saraswati smell ..

4- vidaya the smell of the left side of the page ... Un parvatidevica

5- vidaya mahavisnuca the smell in the small detha page ...

6- vidaya the smell of leaf magilabaju Un candradevata ...

7- vidaya the smell in all the corners of the page #rd ...

8- vidaya panakhali mrtyudevate the smell of .. (For this reason, the method of Buda bhagakadhuna consumption while not tambulaseva).

9- vidaya of the page dethata ego goddess Lakshmi and live in poverty ... (remove the stalk of the leaf, therefore making consumption ..
Lakshmi ego and poverty should be yaarthi ..)

10 vidaya middle of manmathaca smell after page ...

The smell of all these deities vidaya wrench in the tambulasa
Is so important.

By the end of the page will be shown to the Devas offer pre or northward.

If they piper whose cudahy
With respect to placing it before maganca see the ...

Tuesday, Friday and any
The reasons out of the house leaves vidayaci
Do not be ...

Green and cool palmate
The leaves are offered to
And worked as a piper
Shall ...

Thursday, July 2, 2015

VIP

[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: कुंडलीत घरे बारा असली, तरी ग्रह बारा नाहीत. पूर्वी नऊ ग्रह मानीत आता प्रजापती (युरेनस किंवा हर्शल), वरुण (नेपच्यून) व कुबेर (प्लूटो) यांचा शोध लागला. त्यामुळे सर्व घरांत ग्रह असतात असे नाही. काही घरे रिकामीच असतात. त्या घरांत ग्रह नसले, तरी त्या घरांवर कोणती ना कोणती राशी मात्र असते व तिचा अंमल त्या स्थानावर असतो व त्यानुसार शुभाशुभ फल मिळते. कुंडलीत १ ते १२ जे आकडे मांडले जातात ते राशींचे निदर्शक असतात. उदा., आ. २ मधील कुंडली पहा. या कुंडलीतील ४ हा आकडा पहिल्या घरात आहे. म्हणजे चौथी-कर्क ही राशी-लग्नी आहे. म्हणजे या कुंडलीत कर्कलग्न आहे व तेथे गुरुचंद्र आहेत. धनस्थानी कोणी नाही. तेथे सिंह राशी आहे. आत या राशींचे गुण कळावेत यासाठी त्यांचे अधिपती खालील कोष्टकात दाखविल्याप्रमाणे ठरविले आहेत
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: शुभाशुभ ग्रह : बुध, चंद्र, शुक्र, गुरू हे सामान्यतः शुभ ग्रह आणि शनी, मंगळ, रवी, राहू, केतू हे अशुभ ग्रह समजण्याची वहिवाट सामान्यतः भारतीय व पाश्चात्त्य दोन्ही शास्त्रांत आहे; परंतु पाश्चात्त्य रवी शुभ मानतात. ग्रहांचे शुभाशुभत्व ठरविण्याची भारतीयांची एक फार महत्त्वाची स्वतंत्र कसोटी आहे. गुरूसारखा ग्रह शुभ्र आहे हे खरे आहे; पण जर अष्टस्थानासारख्या मृत्युस्थानाचे नियंत्रण त्याची राशी करीत असेल, म्हणजे तो जर अष्टमेश असेल, तर (अष्टमाशिवाय अन्य) कोणत्याही ठिकाणी त्याचे शुभ फल मिळणे अशक्य आहे. म्हणजे हा अष्टमेश असून सप्तमात पडला, तर तो विवाहसुखात विघ्न आणील. पाश्चात्त्य शास्त्रात भावेशाला एवढे महत्त्व नाही. त्यांच्या मते गुरू तो शुभच, तो कोणत्याही स्थानांचा अधिपती असला, तरी तो शुभच होय. शनी पाप ग्रह खरा; पण लग्न जर वृषभ किंवा तूळ असेल, तर भारतीयांच्या मते कुंडलीत शनी हा शुभफलदायी ठरेल
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: राशींचे स्वभाव : राशी या केवळ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात असे नाही, तर ग्रहांचा श्रेष्ठकनिष्ठपणा राशींवर अवलंबून राहतो. यांशिवाय राशी स्वतंत्रपणे कशा ना कशाचे प्रतिनिधित्व करतात. मेष-डोके, वृषभ-गळा या क्रमाने मीन-पावले याप्रमाणे त्यांचा संबंध मानवी शरीरावर असल्याने रोगनिदान कार्यात त्यांचे महत्त्वाचे कार्य असते. वृषभ व तूळ या दोन्ही शुक्राच्या राशी असल्या, तरी त्यांचे स्वभाव परस्परभिन्न आहेत. बुद्धिप्रधान व्यक्ती मिथुन, तूळ, कुंभ राशींत सापडतात, तर व्यवहारनिष्ठांच्या राशी वृषभ, वृश्चिक इ. असतात. चर, स्थिर, द्विस्वभाव असे राशींचे यथार्थ वर्गीकरण करण्यात आले आहे
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: शुभाशुभ योग : गुरूसारखा शुभ ग्रह भाग्येश असून लग्नेशासह उच्च राशीत असेल, तर तो पूर्ण शुभ मानला जाईल; परंतु त्याबरोबर त्याच्याशी कोणाचा अशुभयोग असता कामा नये. सामान्यतः शुभग्रहांच्या युती शुभ मानल्या जातात; अशुभग्रहांच्या अशुभ मानल्या जातात. युती म्हणजे दोन ग्रहांमध्ये शून्य अंश अंतर. हे अंतर १८०° झाले की, प्रतियुती मानली जाते. पाश्चात्त्य शास्त्र हा प्रतियुती योग सर्वथा अशुभ मानतात. भारतीयांच्या मते शुभग्रहांची प्रतियुती शुभच असते. उदा., गुरु-चंद्र प्रतियुती हा गजकेसरी योग मानतात. एक शुभ व एक अशुभ यांचा प्रतियोग संमिश्र फले, तर दोन अशुभ ग्रहांचा प्रतियोग पूर्ण अशुभ फले देतो. उदा., एखाद्याच्या पहिल्या घरात मंगळ व सप्तमात प्रतियोगात शनी असेल, तर त्याचे वैवाहिक जीवन अडथळ्यांचे ठरेल. १२०° अंतर असणाऱ्या योगास त्रिकोण व ६०° अंतर असणाऱ्या योगास लाभयोग किंवा त्रिरेकादशयोग मानतात. त्रिकोण व लाभयोग शुभ आणि ९०° चा केंद्रयोग वाईट समजण्याची वहिवाट पाश्चात्त्यांमध्ये आहे. भारतीय ज्योतिषात अशा अंतरनिष्ठ योगांना महत्त्व नसून दृष्टियोगांना महत्त्व आहे. उदा., शनीला ३, ७, व १० आणि मंगळाला ४, ७, ८ व १२ या दृष्टी आहेत. गुरूला ५, ७ व ९ या दृष्टी आहेत. बाकी सर्व ग्रहांना फक्त ७ वी दृष्टी असते. शुभग्रहांची दृष्टी शुभ व पापग्रहांची दृष्टी अशुभ मानली जाते. उदा., आ. २ मध्ये दिलेल्या कुंडलीत गुरूची दृष्टी ५, ७ व ९ या स्थानांवर आहे म्हणजे त्या घरांची शुभफले मिळतील; पण शनीची दृष्टी दशमावर आणि दशमातल्या ग्रहांवर आहे म्हणून पितृसौख्यात, व्यवसायात अनंत अडचणी येतील. पाश्चात्त्य ज्योतिषी फक्त योग पहातात, त्यांच्यात दृष्टिविचार नाही [⟶ अवस्थिति]
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: योग अटळ असतात काय ? होणारे जर चुकणार नसेल, तर जे काही होणार ते आधी कळून उपयोग काय ? आणि त्यात बदल करता येणार असेल, तर मग ते योग हे नियम या दर्जाला कसे प्राप्त होणार ? अशी रास्त शंका फलज्योतिषाबाबत अनेकांच्या मनात येते. त्याबाबत भारतीय फलज्योतिषाचे उत्तर असे आहे की, योग अटळ असतात हे तर खरेच आहे, कोणत्याही लौकिक उपायांनी ते टळणार नाहीत; परंतु आध्यात्मिक सामर्थ्याने त्यांना इष्ट ते वळण लावता येते. अर्थ व काम हे पुरुषार्थ फारसे स्वाधीन नाहीत; पण धर्म व मोक्ष हे पुरुषार्थ ग्रहांच्या आधीन नसतात, असा या म्हणण्याचा आशय आहे. ज्याप्रमाणे काही रोग औषधोपायांनी बरे होतात व काही बरे न होणारे असतात, त्याप्रमाणे काही योगांवर मात करता येते व काही योग अटळ असतात. जे अटळ आहे ते जर आधी कळले, तर मनुष्य आपली कार्यशक्ती त्या साध्य न होणाऱ्या गोष्टीपेक्षा इतर अनेक चांगल्या उपयोगात वापरू शकेल आणि आपल्या शक्तीचा व जीवनाचा अधिकात अधिक उपयोग करू शकेल, हा यथार्थ फलज्योतिष समजण्याचा मोठाच उपयोग आहे
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: सायन व निरयन : पाश्चात्त्य सर्व सायनवादी आणि भारतीय परंपरा निरयनवाद्यांची आहे. निरयन पक्षातही दोन-तीन पोटपक्ष आहेत. वास्तविक हा जो फरक आहे हा गणिताचा फरक आहे. राशिचक्रास जेथून आरंभ होतो तो संपातबिंदू चल असतो. त्याची गती लक्षात घेऊन गणित करणारे ते सायनवादी. निरयनवाद्यांनी राशिचक्राचा आरंभ एकदा एका विशिष्ट ताऱ्यापासून जो मानला आहे, त्या ताऱ्याप्रमाणेच कायम मानला आहे. त्यामुळे सूर्य मकरवृत्तात २३ डिसेंबरला जात असला, तरी भारतीयांची मकरसंक्रांत १४ जानेवारीस होते. प्राचीन भारतीय ज्योतिर्गणिती व फलज्योतिषी सायनवादी असावेत. अर्वाचीन भारतीय ज्योतिषांमध्ये शं. बा. दीक्षित, ग. प्र. दीक्षित, वि. गो. नवाथे, य. के. प्रधान, जी. ब. चिटणीस, द्वा.ना. राजे असे अनेक महाराष्ट्रीय ज्योतिषी सायन पक्षाचा पुरस्कार फलितदृष्ट्या करू लागले होते. हा वाद तसा मिटलेला नाही. अनुभव हीच फलज्योतिषाची कसोटी आहे. ग्रह (आणि त्यांचे गुणधर्म), त्यांचे स्थान, त्यांची दृष्टी अथवा योग हे दोन्ही पद्धतींच्या कुंडलीत समानच राहतात. बदल पुष्कळदा होतो तो राशींचा. त्यामुळे कोठल्याही पद्धतीने विचार केला, तरी फलितात फारसा फरक पडू नये. भारतीय परंपरेतील ज्योतिषी भावचलित पत्रिकेचा विचार कमी प्रमाणात करतात.

 

 पाश्चात्त्य परंपरेत कालनिर्णयास गोचर ग्रह व दिनवर्ष पद्धती वापरतात, तर भारतीय परंपरा त्यासाठी गोचर ग्रह आणि दशा पद्धतीचा वापर करते.
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: कुडली कशी पाहतात? : लग्नकुंडली व राशिकुंडली पत्रिकेत मांडण्याची वहिवाट आहे. महत्त्व असते ते लग्नकुंडलीला. लग्न, लग्नेश, रवी आणि चंद्र यांची स्थिती जर चांगली असेल, तर आयुष्य, आरोग्य, कर्तुत्व आणि सुख या बाबतींत त्या प्रमाणात त्या व्यक्तीचा दर्जा मोठा राहतो. त्यानंतर मग एका एका दृष्टीने त्या पत्रिकेचा विचार करतात. उदा., विवाहसुखाचा विचार करावयाचा असेल, तर शुक्र, चंद्र, सप्तमस्थान, सप्तमेश आणि सप्तमातील ग्रह यांच्या अवलोकनावरून विवाह कसा ठरेल येथपासून पुढे वैवाहिक जीवनाबद्दलच्या सर्व गोष्टींचा अंदाज बांधण्यात येतो
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: स्थिर तारे व वर्गबल : पाश्चात्त्य आणि भारतीय फलज्योतिषांत आणखी एक फरक आहे. ग्रहांचे बलाबल आणि कुंडलीचा दर्जा ठरविण्यासाठी भारतीयांनी राशींचे नवमांश, द्रेष्‌काण, होरा, त्रिशांश इ. सहा प्रकारचे भाग पाडले. जो ग्रह त्या पोटविभागातही स्वगृही बलवान किंवा मित्रक्षेत्री अथवा उच्च राशीत असेल, तो ग्रह अधिक बलवान मानतात. जुन्या पुराणकथांमध्ये अवतारी पुरुषांच्या जन्माचे वर्णन करताना असा उल्लेख येतो, की त्याच्या जन्मकाळी अमुक इतके ग्रह उच्च राशीत होते व अमुक इतके ग्रह उच्च नवमाशांत होते अथवा वर्गबली होते. पाश्चात्त्यांनी (उदा., ॲलन लीओ यांनी) या भारतीय परंपरेचा वापर केलेला असला, तरी त्यांचे मुख्य लक्ष स्थिर ताऱ्यांवर असते. नक्षत्रांप्रमाणे अनेक तारे काही राशींच्या काही अंशावर कायम वास्तव्य करून असतात. नक्षत्रांचे योगतारे हे पुष्कळदा नक्षत्रदृष्ट्या असणाऱ्या राशिविभागाबाहेर असतात. त्यांच्या सान्निध्यामुळे ग्रहांचे बलाबल जाणण्याची वहिवाट पाश्चात्त्यांमध्ये असते. शिवाय एखाद्या कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या सहमबिंदूंचा (कारक ग्रहाचे पत्रिकेतील रवीपासूनचे अंतर लग्न बिंदूत मिळवून येणाऱ्या काल्पनिक बिंदूंचा) ते उपयोग करतात
[7:54 PM 2-7-2015] ‪+91 93223 89969‬: ग्रहांचे गुणधर्म : पाश्चात्त्य व पौर्वात्य या दोन्ही परंपरांमध्ये ग्रहविषयक कल्पना आणि त्यांचे गुणधर्म समान मानले आहेत. ग्रहांच्या स्वगृह, उच्च, नीच यांबद्दलच्या कल्पनाही समान आहेत. उदा., मंगळ हा मेषेत व वृश्चिकेत स्वगृही, मकरेत उच्च आणि कर्केत नीच असतो. रवी हा आत्माकारक ग्रह आहे. माणसाची जीवनशक्ती, त्याची कार्यशक्ती, प्रतिष्ठा, यशापयश, पितृसुख, वरिष्ठांशी संबंध ह्या गोष्टींचा बोध रवीवरून होतो. चंद्र हा मानसिक व प्रापंचिक सौख्याचा कारक आहे. भौतिक सुखांचा बोध शुक्रावरून होईल. गुरू हा ज्ञान, प्रसिद्धी, नेतृत्व व धर्मभावनांचा ग्रह आहे. बुद्धिमत्तेची देणगी बुधावर अवलंबून असते. तत्त्वदृष्टी, मुत्सद्दीपणा, चिकाटी हे मानसगुण व दैन्य, दारिद्र्य, दीर्घ काळ टिकणारी संकटे व व्याधी या गोष्टी शनीच्या कक्षेत असतात. घणाघाती संकटे, उघड विरोध, अपघात, आघात, पराक्रम, साहस, शौर्य इ. सर्वांचा बोध मंगळामुळे होतो. रवी हा शासनसंस्था किंवा सरकार दर्शवितो, तर चंद्र सर्व प्रजा व सार्वजनिक कल्याण करणाऱ्या संस्था दर्शवितो. करमणुकीच्या व चैनीच्या पदार्थांवर शुक्राची सत्ता असते. मुद्रण, लेखन, प्रकाशन, वक्तृत्व इ. कार्ये करणाऱ्या व्यक्ती, संस्था व पदार्थ बुधाच्या अंमलाखाली असतात. याप्रमाणे ग्रहांचे विविध गुणधर्म राशिपरत्वे, स्थानपरत्वे, योगपरत्वे कसेकसे भिन्नभिन्न मिळतात, हे ज्योतिषग्रंथात विस्ताराने सांगितलेले असते. भारतीय जुन्या परंपरेप्रमाणे फक्त नऊ ग्रह विचारात घेतले जात. आता प्रजापती, वरुण व कुबेर यांचे शोध लागल्यापासून त्यांच्या गुणधर्माचा विचार पाश्चात्त्य आणि त्यांबरोबर भारतीय आधुनिक ज्योतिषी करू लागले आहेत. आकस्मिक संकटे, प्रचंड उलथापालथी, अचानक लाभ किंवा नुकसान, तीव्र कल्पनाशक्ती आणि संशोधन यांचा संबंध प्रजापतीशी जोडला जातो. उदा., शुक्र-प्रजापती, चंद्र-प्रजापती युतीवर महान प्रतिभावंत कलावंत जन्मतात. वरुण हा गूढ अतींद्रिय अनुभव, अनाकलनीय रोग, मानसरोग इत्यादींचा व दीर्घकाल टिकणाऱ्या व्याधींचा किंवा संकटांचा कारक ग्रह समजला जातो. कुबेराबद्दल विशेष संशोधन झालेले नाही. लग्न, रवी, चंद्र यांच्या अंशात्मक युतीत प्रतियोगातच तो जास्त महत्त्वाचा ठरतो. एरवी त्याला स्वतंत्र फलित फारसे नाही. मानवाने पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्रावर पाऊल ठेवलेले असले आणि दुसरे पाऊल मंगळाच्या दिशेने उचललेले असले; तरी चंद्र, मंगळ इ. ग्रहांनी आपली कक्षा न सोडता आपले कार्य पूर्ववत चालू ठेवले आहे, अशी आधुनिक ज्योतिषांची श्रद्धा आहे
[8:52 PM 2-7-2015] ‪+91 97634 38641‬: श्रीपादश्रीवल्लभ चरित्रात नरसिंह अवधानी व श्रीपादश्रीवल्लभ संवादात स्पष्टपणे वर्णन आले आहे की,कुठल्याही आध्यात्मिक उपाय व परिहार केल्याने अजिबात ग्रहपीडा कमी होत नसुन ती विहित प्रमाणात भोगाविच लागते.उपासने मुळे जातकाला पीडा सहन करताना विशेष शक्ती प्राप्त होते.जेणेकरुन जातकाला पीडा सुसह्य होते.अथवा कमी झाल्यासारखे वाटते.....