Wednesday, April 29, 2015

33 कोटी देवी देवता...

पाण्डव पाँच भाई थे जिनके नाम हैं -
1. युधिष्ठिर    2. भीम    3. अर्जुन
4. नकुल।      5. सहदेव

( इन पांचों के अलावा , महाबली कर्ण भी कुंती के ही पुत्र थे , परन्तु उनकी गिनती पांडवों में नहीं की जाती है )

यहाँ ध्यान रखें कि… पाण्डु के उपरोक्त पाँचों पुत्रों में से युधिष्ठिर, भीम और अर्जुन
की माता कुन्ती थीं ……तथा , नकुल और सहदेव की माता माद्री थी ।

वहीँ …. धृतराष्ट्र और गांधारी के सौ पुत्र…..
कौरव कहलाए जिनके नाम हैं -
1. दुर्योधन      2. दुःशासन   3. दुःसह
4. दुःशल        5. जलसंघ    6. सम
7. सह            8. विंद         9. अनुविंद
10. दुर्धर्ष       11. सुबाहु।   12. दुषप्रधर्षण
13. दुर्मर्षण।   14. दुर्मुख     15. दुष्कर्ण
16. विकर्ण     17. शल       18. सत्वान
19. सुलोचन   20. चित्र       21. उपचित्र
22. चित्राक्ष     23. चारुचित्र 24. शरासन
25. दुर्मद।       26. दुर्विगाह  27. विवित्सु
28. विकटानन्द 29. ऊर्णनाभ 30. सुनाभ
31. नन्द।        32. उपनन्द   33. चित्रबाण
34. चित्रवर्मा    35. सुवर्मा    36. दुर्विमोचन
37. अयोबाहु   38. महाबाहु  39. चित्रांग 40. चित्रकुण्डल41. भीमवेग  42. भीमबल
43. बालाकि    44. बलवर्धन 45. उग्रायुध
46. सुषेण       47. कुण्डधर  48. महोदर
49. चित्रायुध   50. निषंगी     51. पाशी
52. वृन्दारक   53. दृढ़वर्मा    54. दृढ़क्षत्र
55. सोमकीर्ति  56. अनूदर    57. दढ़संघ 58. जरासंघ   59. सत्यसंघ 60. सद्सुवाक
61. उग्रश्रवा   62. उग्रसेन     63. सेनानी
64. दुष्पराजय        65. अपराजित
66. कुण्डशायी        67. विशालाक्ष
68. दुराधर   69. दृढ़हस्त    70. सुहस्त
71. वातवेग  72. सुवर्च    73. आदित्यकेतु
74. बह्वाशी   75. नागदत्त 76. उग्रशायी
77. कवचि    78. क्रथन। 79. कुण्डी
80. भीमविक्र 81. धनुर्धर  82. वीरबाहु
83. अलोलुप  84. अभय  85. दृढ़कर्मा
86. दृढ़रथाश्रय    87. अनाधृष्य
88. कुण्डभेदी।     89. विरवि
90. चित्रकुण्डल    91. प्रधम
92. अमाप्रमाथि    93. दीर्घरोमा
94. सुवीर्यवान     95. दीर्घबाहु
96. सुजात।         97. कनकध्वज
98. कुण्डाशी        99. विरज
100. युयुत्सु
( इन 100 भाइयों के अलावा कौरवों की एक बहनभी थी… जिसका नाम""दुशाला""था,
जिसका विवाह"जयद्रथ"सेहुआ था )

"श्री मद्-भगवत गीता"के बारे में-

ॐ . किसको किसने सुनाई?
उ.- श्रीकृष्ण ने अर्जुन को सुनाई।

ॐ . कब सुनाई?
उ.- आज से लगभग 7 हज़ार साल पहले सुनाई।

ॐ. भगवान ने किस दिन गीता सुनाई?
उ.- रविवार के दिन।

ॐ. कोनसी तिथि को?
उ.- एकादशी

ॐ. कहा सुनाई?
उ.- कुरुक्षेत्र की रणभूमि में।

ॐ. कितनी देर में सुनाई?
उ.- लगभग 45 मिनट में

ॐ. क्यू सुनाई?
उ.- कर्त्तव्य से भटके हुए अर्जुन को कर्त्तव्य सिखाने के लिए और आने वाली पीढियों को धर्म-ज्ञान सिखाने के लिए।

ॐ. कितने अध्याय है?
उ.- कुल 18 अध्याय

ॐ. कितने श्लोक है?
उ.- 700 श्लोक

ॐ. गीता में क्या-क्या बताया गया है?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग मार्गो की विस्तृत व्याख्या की गयी है, इन मार्गो पर चलने से व्यक्ति निश्चित ही परमपद का अधिकारी बन जाता है।

ॐ. गीता को अर्जुन के अलावा
और किन किन लोगो ने सुना?
उ.- धृतराष्ट्र एवं संजय ने

ॐ. अर्जुन से पहले गीता का पावन ज्ञान किन्हें मिला था?
उ.- भगवान सूर्यदेव को

ॐ. गीता की गिनती किन धर्म-ग्रंथो में आती है?
उ.- उपनिषदों में

ॐ. गीता किस महाग्रंथ का भाग है....?
उ.- गीता महाभारत के एक अध्याय शांति-पर्व का एक हिस्सा है।

ॐ. गीता का दूसरा नाम क्या है?
उ.- गीतोपनिषद

ॐ. गीता का सार क्या है?
उ.- प्रभु श्रीकृष्ण की शरण लेना

ॐ. गीता में किसने कितने श्लोक कहे है?
उ.- श्रीकृष्ण जी ने- 574
अर्जुन ने- 85
धृतराष्ट्र ने- 1
संजय ने- 40.

अपनी युवा-पीढ़ी को गीता जी के बारे में जानकारी पहुचाने हेतु इसे ज्यादा से ज्यादा शेअर करे। धन्यवाद

अधूरा ज्ञान खतरना होता है।

33 करोड नहीँ  33 कोटी देवी देवता हैँ हिँदू
धर्म मेँ।

कोटि = प्रकार।
देवभाषा संस्कृत में कोटि के दो अर्थ होते है,

कोटि का मतलब प्रकार होता है और एक अर्थ करोड़ भी होता।

हिन्दू धर्म का दुष्प्रचार करने के लिए ये बात उडाई गयी की हिन्दुओ के 33 करोड़ देवी देवता हैं और अब तो मुर्ख हिन्दू खुद ही गाते फिरते हैं की हमारे 33 करोड़ देवी देवता हैं...

कुल 33 प्रकार के देवी देवता हैँ हिँदू धर्म मे :-

12 प्रकार हैँ
आदित्य , धाता, मित, आर्यमा,
शक्रा, वरुण, अँश, भाग, विवास्वान, पूष,
सविता, तवास्था, और विष्णु...!

8 प्रकार हे :-
वासु:, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष और प्रभाष।

11 प्रकार है :-
रुद्र: ,हर,बहुरुप, त्रयँबक,
अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी,
रेवात, मृगव्याध, शर्वा, और कपाली।

एवँ
दो प्रकार हैँ अश्विनी और कुमार।

कुल :- 12+8+11+2=33 कोटी...

Tuesday, April 28, 2015

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे !

थोरल्या श्री शिवछत्रपती महाराजांचं स्वप्नं बहुतांशी पुर्ण करणारा, हिन्दुस्थानातील मोंगल, निजाम, हैदर, सिद्दी अशा सुलतानांना आणि इंग्रज, पोर्तुगिज अशा परकीय सत्तांना मात देणारा एकमेवाद्वितिय अजिंक्य योद्धा म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे !

श्री शिवछत्रपती महाराजांनंतर सर्वात आधी जर एखाद्या पराक्रमी अन् बुद्धिनेही तितक्याच हुशार सेनापतीचं नाव घ्यायचं झालं तर ते बाजीरावांचं घ्यावं लागेल ! शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मनामनात रुजवलेल्या गनिमी काव्याचे तर बाजीराव पंडित होते. बाजीरावांनी खेळलेल्या लढायांचा इतिहास पाहता आपल्याला ठायी ठायी याची प्रचिती येते.

दि. १७ एप्रिल १७२० रोजी वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी पेशवेपद मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत बाजीरावांना युद्धाच्या आघाडीवर जावे लागले. दिल्लीदरबारच्या सय्यद बंधूंपैकी हुसेनअली सय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदाराविरूद्ध् लढत होता, परंतू त्याला यश येत नव्हते. म्हणूनच त्याने सातार्‍याला शाहू महाराजांना पत्र पाठवून मदत पाठवण्यास कळवले. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना खानदेशात जाण्याची आज्ञा केली. पेशवे आपल्या फौजेसह खानदेशात पोहोचले. परंतू त्याच सुमारास बाळाजी विश्वनाथ गेल्याची खबर मिळालेला निजाम-उल-मुल्क मीर कमरुद्दीन सिद्दिकी हा स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीतच होता. आता मात्र नुकत्याच गादीवर आलेल्या तरूण बाजीराव पेशव्यांची ही खरी कसोटी होती. प्रथम बाजीरावांनी शाहूंच्या आज्ञेबरहूकूम खानदेशात हुसेनअल्लीला मदत करून बंड मोडले. इतक्यात निजामाच्या फौजा शेवगाव-पैठण ओलांडून औरंगाबादच्या परिसरात पोहोचल्याचे बाजीरावांच्या हेरांनी कळवले. अतिशय जलद हालचा ली करून, निजाम औरंगाबाद जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पेशव्यांच्या फौजा निजामावर तुटून पडल्या. युद्धाच्या आघाडीवर स्वतः पेशवे युद्धवेश घालून सैन्याला जोश देत होते. मराठ्यांचा तो भयप्रद आवेश आणि आकाशाला भेदणार्याा त्या रणगर्जना ऐकून निजामाचे निम्मे सैन्य जागच्या जागीच गर्भगळीत झाले. आणि शेवटी अपेक्षीत होते तेच झाले. निजामाचा दारूण पराभाव झाला. बाजीराव पेशवा दिसायला एखाद्या स्त्रीलाही लाजवेल असा ’सुरतपाक’ सुंदर आहे हे कळल्यानंतर निजामाच्या बेगमांनी बाजीरावांना पाहण्याचा हट्ट धरला. जेव्हा बाजीराव आले तेव्हा तर निजामाच्या बेगमांनी चिकाच्या पडद्याआडून बाजीरावांवर चक्क मोती उधळले. अर्थात हा सारा प्रकार पाहून निजामाचे काय झाले असेल हे वेगळे सांगायलाच नको !

मार्च १७२१ मध्ये दिल्लीदरबारचा माळव्याचा सुभेदार दाऊदखान पन्नी याने बंड मांडले. सोरटी सोमनाथच्या पवित्र ज्योतिर्लिंगालाही तो उपद्रव देऊ लागला. हे पाहताच स्वतः पेशव्यांनी माळव्यात जाऊन त्याचा पराभव केला. ( जून १७२१ ). माळवा हा प्रांत अतिशय सुपिक आणि मोक्याचा होता. दाऊदखान पन्नीच्या पराभवानंतर बादशाहाने त्याच्या जागी दयाबहाद्दर या पराक्रमी राजपूतास नेमले होते. स्वराज्याला समृद्ध बनवण्यासाठी माळवा आपल्याकडे हवा असे बाजीरावांना वाटत होते. इकडे दिल्लीदरबारकडून मिळालेली चौथाई व सहा सरसुभे दख्खन्ची सरदेशमुखी निजाम सहजासहजी सोडत नव्हता. मग ती चौथ माळव्यातून का वसूल करू नये अशा आशयाचे पत्र बाजीरावांनी दयाबहाद्दरकडे रवाना केले, आणि दयाबहाद्दरच्या उत्तराची वाटही न बघता स्वतः पेशव्यांनी इ.स.१७२३ च्या अखेरीस माळव्यात जाऊन वसुलीला सुरवात केली. अर्थातच हे पाहताच दयाबहाद्दर भडकला. परंतू तो सैन्य घेऊन उज्जैनीच्या वेशिबाहेर पडतो न पडतो तोच बाजीरावांच्या तुफानी फौजेने त्याच्यावर मारा सुरू केला. मोंगली सैन्य अचानक आलेल्या या हल्ल्याने बावचळले ! अन् अशातच खुद्द बाजीराव पेशव्यांचीच दयाबहाद्दरशी गाठ पडली. अखेरीस दयाबहाद्दरने गुढघे टेकले. तो पेशव्यांना शरण आला. पेशव्यांच्या अटी दयाबहादरने बिनशर्त कबूल केल्या आणि शेवटी पेशव्यांच्या फौजा पुण्याच्या रोखाने वळल्या, पण नुसत्या नव्हे... माळव्यातून इतक्या वर्षांच्या चौथाई आणि सरदेशमुखीचा महसूल बरोबर घेऊनच !

बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई म्हणजे ’पालखेडची लढाई’. इ.स.१७२५ मध्ये बाजीराव पेशवे कर्नाटकात उतरून त्यांनी अर्काटचा नबाब, चित्रदूर्ग, लक्ष्मेश्वर, गदग, कनकगिरी, सुरापूर, गुबी, म्हैसूर, श्रीरंगपट्टणम, बिदनूर अशी संस्थाने मराठी राज्याची मांडलीक बनवली. बाजीराव कर्नाटकात आहे याचा फायदा घेऊन इकडे निजामाने खुद्द पेशव्यांच्या पुण्यावरच हल्ला करण्याचा बेत आखला. निजामाच्या फौजा हैद्राबादहून कूच करताच बाजीरावांना हेरांकरवी ही वार्ता समजली. निजाम स्वराज्यात शिरतो न शिरतो तोच त्याला एक भयंकर बातमी समजली... बाजीराव पेशवा फौजेनिशी खुद्द आपली राजधानी, हैद्राबाद जवळ करतोय ! आणि खरेच होते ते... बाजीरावांच्या मराठी फौजांनी निजामाच्या मुलूखात लुटालूट आणि जाळपोळ सुरू केली होती. झालं ! इथे बाजीरावांच्या पुण्याला जाळण्याची स्वप्नं पाहणारा निजाम हातभर उडालाच ! त्याचे बुलंद अस्मानी बुरूज धडाधड कोसळू लागले. निजामाने ताबडतोब आपल्या सैन्याला हैद्राबाद जवळ करण्यास सांगून त्या हेतूने आपला अवजड तोफखाना अहमदनगरलाच ठेवून तो पारनेरा, चांभारगोंदे, नगर, पैठण या मार्गाने परत फिरला. निजामाच्या प्रत्येक हालचालींवर बाजीराव पेशव्यांची नजर होती. निजाम औरंगाबाद जवळ असणार्या् पालखेडच्या मैदानात पोहोचतो न पोहोचतो तोच बाजीरावांच्या फौजांनी पालखेड गाठले. रात्री निजामाचा तळ पालखेडच्या मैदानात पडला. निजामाचे सैन्य गाढ झोपी गेले. हे पाहताच पेशव्यांनी अतिशय अलगद, निजामाच्या सैन्याला गराडले आणि मुख्य म्हणजे जवळचा पाणवठा ताब्यात घेऊन त्याचे पाणी तोडले. दुसर्याा दिवशी निजाम बघतो तो काय? मराठ्यांनी आपल्याला वेढलेले आणि खुद्द बाजीराव पेशवे हातात तलवार घेऊन आघाडीला उभे होते. निजामाने भराभर आपल्या सैन्याला हुशार करून लढाईला तोंड फोडले. मराठ्यांची फौज उधळून लावून कोंडी फोडण्याचा निजामाने आटोकाट प्रयत्न केला. पण मराठे त्याला पुन्हापुन्हा आत ढकलत होते. निजामाच्या सैन्याला प्रचंड तहान लागलेली होती. मराठवाड्याचा मुलुख हा ! उकाडा जिव काढत होता. आणि अशातच पाणवठ्यावर मराठ्यांच्या सशस्त्र चौक्या बसलेल्या ! पाण्यावाचून निजामाची अवस्था फारच बिकट झाली.अखेरीस नाईलाजाने निजाम दाती तृण धरून शरण आला. बाजीरावांच्या चौथाई आणि सरदेशमुखीच्या आणि कोल्हापूर दरबारला मदत न करण्याच्या अटी बिनतक्रार मान्य करून निजामाने शरणागती पत्करली. पालखेडचे हे युद्ध दि.२५ फेब्रुवारी रोजी झाले आणि लगेचच ६ मार्च १७२८ या दिवशी मुंगी-पैठण येथे निजाम-उल-मुल्क मीर कमरूद्दीन सिद्दीकी आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यात तह झाला. पुढे साधारण दहा वर्षांनी (इ.स.१७३८) बाजीराव पेशवे दिल्लीवर चाल करून येत आहेत हे पाहताच दिल्लीच्या बादशाहाने निजामाला मदतीसाठी साद घातली. निजामाला हेच हवे होते. निजाम बाजीरावांना अडवण्यासाठी भोपाळ येथे तळ देऊन राहीला, आणि निजामाच्या दुर्दैवाने पालखेडला जे झाले त्याचीच पुनरावृत्ती येथे झाली. पेशव्यांनी अतिशय जलद हालचाली करून निजामाला वेढले आणि त्याचे पाणी तोडले. निजामाचा मुलगा नासिरजंग हा बापाच्या मदतीसाठी जात असता तापी नदीच्या दक्षिण तिरावरच चिमाजीआप्पांच्या फौजेने त्याला रोखून धरले. अखेरीस चंबळ आणि नर्मदा नदीच्या अंतर्वेदीतील सर्व प्रदेश मराठ्यांना द्यावा आणि या मोहीमेसाठी खर्चाचे म्हणून पेशव्यांना पन्नस लक्ष रुपये द्यावेत या अटी बिनशर्त कबूल करून निजाम शरण आला आणि आता या पेशव्याला अडवणे कोणालाही शक्य नाही हे दिल्लीच्या बादशहालाही समजून चूकले...

औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या तालमित तयार झालेल्या निजाम-उल-मुल्काला हरवणे यासारखी अशक्यप्राय गोष्ट बाजीरावांनी एक-दोनदा नव्हे, तीनदा शक्य करून दाखवली. यातच बाजीरावांची हुशारी आणि कर्तबगारी दिसून येते. नुसत्या निजामासारख्या परकियांशीच नव्हे, तर गायकवाड, दाभाडे, भोसले, प्रतिनीधी, मंत्री, डबीर अशा आपल्याच माणसांच्या विरोधाला देखील बाजीराव पुरून उरले.

उण्यापुर्‍या चाळीस वर्षांच्या आयुष्यात, अन् त्यातही केवळ वीस वर्षांच्या पेशवाईच्या काळात बत्तीस लढाया खेळणारा आणि सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यातली एकही लढाई न हारलेला हा अजिंक्य योद्धा एकमेवाद्वितिय आहे !

बाजीरावांच्या युद्धाच्या तयारीचा आणि त्यांच्या योजनांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या यशाचे रहस्य कशात आहे हे नक्की समजू शकते. बाजीरावांच्या या विजयांचे अनेक पैलू होते. त्यात सर्वांत मुख्य म्हणजे सावधपणा ! सावधपणासठी हवी चौफेर नजर. पुण्यात असणार्याू पेशव्यांचे हेर दक्षिणेत तंजावरपासून पार काबूल-कंदहारपर्यंत पसरले होते. असे म्हटले जाई की निजाम सकाळी काय जेव्तो ते संध्याकाळपर्यंत आणि बादशाहाला रात्री काय स्वप्न पडले ते दुसर्याम दिवशी सकाळपर्यंत बाजीरावांना इत्यंभूत समजत असे. ‘ पहिले ते साअधपण अन् दुसरे ते राजकारण ’ हा मंत्र बाजीरावांनी अहोरात्र जपला होता. युद्धशास्त्राचा दुसरा पैलू म्हणजे जलद हालचाली ! बाजीरावांची कुठलीही मोहीम पहा, अतिशय जलद गतीने फौजांच्या हालचाली होत की शत्रूला नेमके पेशवे कुठे आहेत तेच समजत नसे आणि सम्जे तेव्ह बाजीरावसाहेब अगदी हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचले असत. दिवसाला तीस-पस्तिस कोसांची घोड्यावरून दौड ( १ कोस = २ मैल, १ मैल = १.६ कि.मी. ) मारणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती, परंतू हे अंतर पेशव्यांच्या फौजा सहज पार करत.. तिसरा पैलू म्हणजे विश्वासू अन् शूर सरदार ! बाजीरावांनी एकेक सरदार हिर्यारसारखा पारखून घेतलेला. बाजी भिवराव रेठरेकर, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, संताजी कदमबांड, होनाजी बलकवडे, महादजीपंत पुरंदरे असे बाजीरावांचे शूर सवंगडी त्यांच्यासाठी जीव ओतायलाही तयार असत. अन् या सगळ्याहून मुख्य म्हणजे अचूक योजना आणि सूत्रबद्ध मांडणी हे सारे पैलू बाजीरावांच्या यशाचे दर्शन घडवतात...

बाजीराव पेशव्यांसारखा अजिंक्य योद्धा शतकानुशतकातूनच जन्माला येतो. एका समकालीन पत्रात तर म्हटलंय, ".. रायांचे (बाजीरावांचे) पुण्यप्रताप ऐसे जाहले की आज हस्तिनापूरचे राज्य घेऊन स्वामींस (शाहू महाराजांस) देतील तरी समय अनुकूल आहे..."

प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार म्हणतात "अस्थिर झालेल्या मराठी राज्याचे स्वातंत्र्य बाजीरावांनी पक्के केले, आणि हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. शिवाजीराजांनी ‘महाराष्ट्रराज्याची’ निर्मिती केली, परंतू त्या राज्याला ‘बृहत्तर महाराष्ट्राचे’ रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला ही गोष्ट सामान्य नव्हे खासच !..."

आणि म्हणूनच या महान पेशव्याचे स्मरण करून, त्यांच्या पवित्र स्मृतींस वंदन करूया... मराठ्यांच्या कर्तृत्वाला नवे आव्हान देणार्‍या, या अजिंक्य योद्ध्याला, श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा... त्रिवार मुजरा !!!

Sunday, April 26, 2015

एक आवडलेली कविता....

दु:खाच्या घरी एकदा
दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ - उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी!

Tuesday, April 21, 2015

* अक्षय तृतीया *

१) अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन
मुहुर्तांतील एक मुहूर्त' मानले जाणे

‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी
एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला.
या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्या
युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली
असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण
दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने
साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा
परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण
दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया
या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त'
मानले जाते.

**अवतार होणे**
अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच
हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि
परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या
तिथीचे महत्त्व लक्षात येते.’

**धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे**
‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान
आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ
होतो’, असे मानले जाते.

२)अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत

‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस
भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा
तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली
आहेत. या दिवसाचा विधी असा आहे - पवित्र
जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान
आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे
आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

**उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून
ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.

१. महत्त्व
उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील
निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

२. उद्देश
१}. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व
प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल,
तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून
त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा
देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर
उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या
चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
२}. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर
मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल
वासना नष्ट करतात.
३}. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य
सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म
कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी
अर्पण केल्या जातात.

३. उदकुंभ दानाचा मंत्र
ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील
मंत्र म्हणावा
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि
पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।।
- धर्मसिन्धु
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले
आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला
आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त
होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त
असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ
माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.

४. शास्त्र
अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड
रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्या
सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात
असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव
यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी
आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला
धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही
क्षय न होणार्या लहरींच्या प्रभावाच्या
साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते.’

**तिलतर्पण करण

१.अर्थ आणि भावार्थ

१}‘तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ
अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे,
तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.
२}देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला
काय अर्पण करणार ? तसेच ‘मी देवाला काहीतरी
अर्पण करतो’, हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण
करतांना ‘देवच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’,
असा भाव ठेवावा. यामुळे तिलतर्पण करतांना
साधकाचा अहं न वाढता त्याचा भाव वाढण्यास
मदत (साहाय्य) होते. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला
तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा
भाव अर्पण करणे होय.

२. तिलतर्पण कोणाला करायचे ?

१}. देवता

१}**. पद्धत

प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा
कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट
हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा
त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून
त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर
‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव
ठेवावा. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण
करीत आहोत’, असा भाव ठेवावा.

२}**.परिणाम
प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर)
तीळ अर्पण केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित
होणारी सात्त्विकता अधिक प्रमाणावर ग्रहण
होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्याचा
भाव जागृत होतो. भाव जागृत झाल्यामुळे
देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता
तिलतर्पण करणार्याला अधिक प्रमाणावर ग्रहण
करता येते.

२}. पूर्वज
२}**. महत्त्व
अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे
मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते.
मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी
मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे.
यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती
मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते.
२}**. पद्धत
पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये
श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी
देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज
सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर
तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव
ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या
तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता
पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ
हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी
सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा
श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी
प्रार्थना करावी.
२}**. परिणाम
तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम
नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे. साधकाच्या
भावानुसार तिलतर्पण करतांना सूक्ष्मातून
ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-
देहावरील काळे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-
देहांतील सात्त्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या
लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते.

३}. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व

अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही
क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या
दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य
मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते
आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे
पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा
वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते;
परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची
नसते, तर त्यांना ईश्वरप्राप्ती करायची असते. यामुळे
साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. येथे
सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत
राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा
सत्च्या कार्यात दान करणे. सत्पात्रे दान केल्यामुळे
दान करणार्याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे
कर्म हे अकर्म कर्म होईल. त्यामुळे त्याची
आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नती
झाल्यामुळे साधक स्वर्गलोकात न जाता उच्च
लोकांत जाईल.’

धनाचे दान:-
वर उल्लेखिल्याप्रमाणे सत्पात्रे दान संत,
धार्मिक कार्य करणार्या व्यक्ती, धर्मप्रसार
करणार्या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम
आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे.

तनाचे दान:-
धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे
तनाचे दान होय. यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक
उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे.

मनाचे दान:-
कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे
यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.

४). महत्त्व
‘सदोदित कृपादृष्टी ठेवणार्या मृत्तिकेमुळेच
आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि
वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया हा
दिवस म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना
करण्याचा दिवस.
१}. मातीत आळी घालणे आणि पेरणी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या
शेतजमिनीचे अक्षय (अक्षय्य) तृतीया या
दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे.
(मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची स्वच्छता
करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.)
अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या
जमिनीतील मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन
करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी
घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ
केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते
आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही.
त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील
धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन
उरलेले धान्य स्वतःला आणि इतरांना पुढच्या
पेरणीसाठी राखून ठेवणे.)

५). वृक्षारोपण
अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून
लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात,
तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या
वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी
वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

६). हळदीकुंक
‘स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस
महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या
दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते...